Sunday, May 31, 2026

नरसोबाची वाडी

कृष्णाकाठी सांज उतरली रंग उधळुनी नभामध्ये,
मन नकळत हरवून गेले त्या शांततेच्या गर्भामध्ये..

संथ वाहते कृष्णामाई घेऊन युगांची कहाणी,
लाटांमधुनी ऐकू येते स्वामींची दिव्य वाणी..

हा तो घाट, ही ती भूमी, तपश्चर्येने पावन झालेली,
बारा वर्षे स्वामींच्या साधनेने धन्य केलेली..

वृक्ष, वेली, कणाकणामध्ये, अजुनी त्यांची चाहूल आहे,
वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीत दत्तनामाची भूल आहे...

दत्तप्रभूंची राजधानी स्वामींची तपोभूमी महान,
जिथे मिटती वादळे मनाची, आणि लाभे आत्मिक समाधान...

संधिप्रकाशी त्या नभाखाली अंतर्मुख हे मन होते,
स्वतःस शोधत शोधत जाता, स्वामींच्या चरणी रमते...

जन्मोजन्मी लाभो सेवा त्या पावन पादुकांची,
श्वासागणिक ओढ लागो, श्रीगुरूंच्या स्मरणाची।

दत्तप्रभूंची राजधानी नरसोबाची वाडी रे,
नित्य स्मरण पादुकांचे आणि मन गुरुचरणी लीन रे,
कृष्णातीरी दे विसावा पादुकांच्या छायेत,
शेवटचा हा श्वास जावो, फक्त स्वामींच्या नामात....🙏🙏

----- विभव जोगळेकर

Friday, May 29, 2026

सुकलेले झाड

एक सुकलेले झाड, झाडावर हिरवी वेल,
त्या वेलीला फुलले एक लहानसे फुल,

झाड सुकून गेलेले, आता मराया टेकलेले,
परी त्या वेलीसाठी शर्थीने उभे ठाकलेले,

ना पाने ना सावली ना पक्ष्याचा थवा सोबतीला,
त्या एका फुलाने मात्र सारा आसमंत गंधाळला,

येई वाऱ्याची झुळुक वेल अलगद डुले,
जणू सुकलेल्या झाडाशी तिचा संवाद हळू चाले,

त्या छोट्याशा फुलाने जादू अशी केली,
फुलपाखरे नि पक्षी झाडाकडे परतली,

ओस पडल्या फांद्यांना पुन्हा वसंत भेटला,
सुकलेल्या झाडालाही जगण्याचा अर्थ मिळाला,

छोटसं ते फुल किती सुचवून गेलं,
जगायचं कसं सांगून ते गेलं...


----- विभव जोगळेकर

Thursday, May 28, 2026

गावाच्या वेशीवर

गावाच्या वेशीवर वृक्ष एक डौलदार,
शेजारी त्या जुने मोडके गरीबाचे एक घर...

पारंब्यांच्या झोक्याला साथ भारी वाऱ्याची,
परी खेळाया तिथे मुले फिरकत ना कोणाची।

घराचे छप्पर कौलारू पावसाने झिजलेले,
भिंतीवर शेवाळ जुने शांतपणे वाढलेले।

दाराशी बसे म्हातारा एकटाच धीरगंभीर,
परतीच्या पावलांचा रस्ता शोधे त्याची नजर।

कधी ऐकू येई आवाज म्हाताऱ्याच्या हसण्याचा,
पौर्णिमेच्या रात्री घुमे नाद तिथे पैंजणांचा।

रात्री म्हणे कधीतरी झोका हलताना दिसे,
पारंब्यांच्या झोपाळ्यावर अस्तित्व कोणाचे भासे।

चांदण्यांच्या उजेडात वृक्ष उभा थरथरे,
त्या मोडक्या घरात पणतीचा उजेड पसरे।

कुणीच ना जाणली त्या म्हाताऱ्याची कैसी व्यथा,
डोळ्यांत साचून राहिली एकाकीपणाची कथा।

आजही ऐकू येतो नाद कधी तिथे पैंजणांचा,
एकटाच झोका न जाणे वाट पाहतो कोणाचा....

— विभव जोगळेकर

Tuesday, May 26, 2026

किनारा

ओढ लावतो मनाला तो मोकळा किनारा,
सूर्यकिरणांनी उजळला वाळूचा पसारा,
खेळ संथ लाटांचा भासे स्वगत समुद्राचे,
वाऱ्यासंगे हरवते भान या देहाचे...

क्षितिजाच्या पल्याड मावळतो दिनकर,
सोनेरी किरणांनी सजला नभाचा दरबार
सावल्यांच्या रेषांमध्ये विरते हे जग सारे,
क्षणैक थांबावे वाटे मना चित्र टिपाया हे सारे,

पावलांचे ठसे माझे अलगद मिटवती त्या लाटा,
जणू सांगती क्षणभंगूर आहेत आयुष्याच्या वाटा,
शांततेच्या गाभाऱ्यात दडले किती ते बोलणे,
निःशब्द त्या सायंकाळी चालती लाटांशी संभाषणे,

ना गर्दीचा गोंधळ ना शब्दांचा पसारा
माझ्या सोबतीला इथे अथांग किनारा,
मनाच्या शांत तळाशी उमटती जुनी वादळे,
स्मृतींच्या त्या मार्जनाने ताण मनाचा निवळे,

आकाशात मग पहिला तारा अलगद चमकून जातो,
आठवण घराची मज हळूच तो करून देतो,
निरोप घेता डोळ्यात भाव दाटे विरहाचे,
वाऱ्यासंगे हरवते पुन्हा भान या देहाचे...

----- विभव जोगळेकर

देव

कोणी पाहिला का देव कैसा दिसतो,
जैसा ज्याचा भाव तैसा त्यास भासतो...

कोणी जातो भक्तीमार्गे, कोणी ज्ञानमार्गी शोधतो,
कोणी योग साधतो कोणी अस्तित्वच ना मानितो,
कोणी दंग रामनामी कोणी सावळ्यास पुजितो,
जैसा ज्याचा भाव तैसा त्यास भासतो...

कोणा कास विज्ञानाची कर्मात देव दिसतो,
कोणी कला साधनेतून देवासंगे रमतो,
कोणी उगाच हक्क सांगून देवासंगेच भांडतो,
जैसा ज्याचा भाव तैसा त्यास भासतो...

देव आहे चराचरी सर्व ठायी वसतो,
ज्याच्या मनी अहंभाव त्यासी ना तो दिसतो,
निर्मळ चित्ते शरण जाता देव त्याचे ठायी वसतो,
जैसा ज्याचा भाव तैसा त्यास भासतो...

------ विभव जोगळेकर

Sunday, May 24, 2026

जाणीव - उणीव

गोठलेल्या मनामध्ये ना कसली जाणीव,
कळते ना मनास या कसली उणीव...

ना सुखावते मन जरी दरवळ मोगऱ्याचा,
ना बोचतो मनास आता दुरावा कुणाचा,
हरवलेल्या भावनांना शोधतोय जीव,
कळते ना मनास या कसली उणीव...

बोलायचे बरेच काही परी शांत मी रहातो,
चेहऱ्यामागील मुखवटे शांत बसून वाचतो,
नात्यांमधील बंध केंव्हाच झाले सुकून निर्जीव,
कळते ना मनास या कसली उणीव...

आठवणींचे ढग कधी दाटून येतात,
साचतो पावसाळा इवल्याशा डोळ्यात,
अश्रू वाहतात परी ना तुटतो हा जीव,
कळते ना मनास या कसली उणीव...

रात्र रात्र मी जागतो वेळ सरतच नाही,
ही तळमळ कशाची काही कळतच नाही,
मन होईल ते शांत जीवा भेटता तो शिव,
मग राहील ना कसली जाणीव - उणीव...

----विभव जोगळेकर

Thursday, May 21, 2026

Twelve years ago, you fit so perfectly in Baba’s arms…
Today, you stand beside him, almost shoulder to shoulder.

From the tiny little boy who found comfort in Aai’s embrace,
to now growing taller than her with every passing day…
we have watched you grow not just in height, but in heart too.

From riding a tiny toy cycle around the house,
to exploring roads, dreams, and little adventures on your bicycle…
every moment of your journey has been special to us.

And now, as you step into your teenage years,
we wish for you to always stay kind, curious, fearless, and full of joy.

No matter how tall you grow, how far you ride, or how big your dreams become,
one thing will never change —
our endless love, pride, and blessings for you. ❤️

Happy 12th Birthday, Nahush!
Welcome to your teenage chapter, champ! 🚲✨

Wednesday, May 20, 2026

Eyes....Be Wise

Eyes… Be Wise

Some eyes meet yours with warmth and light,
Some pass by cold, avoiding sight.
Some search for you in crowded space,
Some never pause to know your face.

Some glance at you and quickly stray,
Some look right through and walk away.
Some fear the day you’re out of view,
Some silently wait just to see you.

Some read your clothes, your skin, your style,
Some judge your worth within a while.
Some see your smile and call it grace,
Some search for flaws they can replace.

Some eyes hold storms they never share,
Some hide their pain behind a stare.
Some speak of love without a sound,
Some leave a soul completely drowned.

Some see the beauty life can weave,
Some only scars they can’t unsee.
Some carry questions deep and wide,
Some hold the answers locked inside.

Eyes can shatter, eyes can heal,
Eyes can hide what hearts still feel.
They can lift a soul above,
Or leave it aching, starved of love.

So when your gaze meets someone’s eyes,
Choose gentle truth, choose being wise.
For eyes remember, long and deep,
The wounds we give… the love we keep.

---- Vibhav Joglekar
 ( inspired by Rajashree's poem)

Thursday, May 14, 2026

संवाद

सापडेल तुम्हाला जिवलग,
तुमच्यातच कुणीतरी,
मारून पहा गप्पा चार,
स्वतःशी कधी तरी...

कशाला हवेत डोळे गुंतलेले,
सतत कामात व मोबाईल मध्ये,
डोळे मिटून संवाद साधा,
स्वतःशी कधी तरी...

कशाला हवे प्रत्येक वीकएंडला,
बाहेर जाणे, मित्रांशी बोलणे,
 "आनंद" शोधाया संवाद साधा,
स्वतःशी कधी तरी...

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
प्रश्न असतात ढीगभर,
उत्तर शोधाया संवाद साधा,
स्वतःशी कधी तरी...

वाटल्यास कधी हरवलोय आपण,
दिशा भरकटली जगण्याची,
मार्ग शोधाया संवाद साधा,
स्वतःशी कधी तरी...

जेंव्हा अस्तित्वाचा प्रश्न,
उभा राहील तुमच्यापुढे,
स्वतःला शोधाया संवाद साधा,
स्वतःशी कधी तरी...

------ विभव जोगळेकर

Friday, May 8, 2026

आपण थंडच राहायचं..... (child version)

परीक्षेचा निकाल लागला 
आई-बाबांचा थोडा ओरडा खाल्ला 
ते कितीही ओरडले 
तरी आपण शांत राहायचं 
आपण थंडच राहायचं ....||१||

हातातली मॅच गेल्यामुळे 
कॅप्टनचा ओरडा खाल्ला 
त्याच्या अशा बोलण्यामुळे 
माझा धीर खचला 
तो कितीही बोंबलला 
तरी आपण शांत राहायचं 
आपण थंडच राहायचं .... ||२||

एक गणित चुकल्यामुळे 
ताई मला ओरडल्या 
पुन्हा असं करू नकोस 
असं त्या म्हणाल्या 
त्या कितीही ओरडल्या 
तरी आपण शांत राहायचं 
आपण थंडच राहायचं.... ||३||

आपली प्रतिकारशक्ती वाढावी 
म्हणून तीच औषध घ्यायची 
एक गोळी रोज रोज 
पाण्यात घालून प्यायची 
ते कितीही कडू लागलं तरी 
आपण शांत राहायचं 
आपण थंडच राहायचं.... ||४||

कितीही कंटाळा आला तरी 
सूर्यनमस्कार घालायचे 
आई सांगते म्हणून 
नाचणीचे सत्व प्यायचे 
कितीही नको वाटलं तरी 
आपण शांत राहायचं 
आपण थंडच राहायचं...||५||

------- नहुष जोगळेकर

आपण थंडच राहायचं

Monday, May 4, 2026

फूल उमलायच्या आधीच....

कुठे चालला आहे समाज आपला,
कसल्या दलदलीत जगतोय आपण,
जिथे चिमुरडीवरच्या अत्याचाराचं,
केलं जात आहे राजकारण....

एवढासा जीव, बालपण निरागस होतं,
स्वप्नांच्या पंखांना, अजून उडायचं होतं,
आई - वडिलांच्या कुशीत इवलसं,
सुरक्षित तिचं आयुष्यं सुरू होतं...

एका नराधमाच्या काळया सावलीनं,
फूल उमलायच्या आधीच चिरडलं,
वासनाधुंद नराधमाच्या  क्रौर्याने आज,
जणू माणुसकीलाच विटाळलं...

रडतंय आभाळ आज, थरथरतंय मन,
या धर्तीवर मात्र वेगळंच सुरू आहे रण,
त्या नराधमाची, त्या चिमुरडीची जात,
आणि त्यावरून सुरू आहे इथे रणकंदन...

कोण कोणाचा, कुठल्या जातीचा,
यातच अडकून पडलोय आपण सारे,
एक निरागस जीव हरपला तरी ही,
वादाच्या ज्वाळेत जळतंय न्यायचं द्वार हे...

का नाही उभे रहात आपण, 
त्या राक्षसाला शिक्षा व्हावी म्हणून?
का अजून एकत्र नाही येत आपण,
चिमुकल्यांच जग सुरक्षित व्हावं म्हणून?

ना फक्त शोक, ना फक्त शब्द,
कृतीतून दाखवू संताप आपला,
चिमुरड्यांसाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी,
उभारुया सुरक्षित समाज आपला...

एक वचन घेऊ आपण सारे,
ना जातीची ना धर्माची होईल भिंत,
जेंव्हा प्रश्न येईल आपल्या मुलांच्या सुरक्षेचा,
तेंव्हा एकच ओळख, आपण भारतीय इतकंच निश्चित....🙏🙏


------ विभव जोगळेकर

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...