Thursday, September 20, 2012

कविता

कविता ही प्रतिभा असते, कवी म्हणवणाऱ्या लोकांची,
शब्दांचा काव्य बनतं, ही देणगी आहे देवाची|

आयुष्याला अर्थ देते, देते दिशा जगण्याला,
लंगड्यालाही पाय देते, आयुष्याच्या शर्यतीत धावायला|

देते दृष्टी कवीला, सूर्याच्या पलीकडे पहायला,
शिकविते रडता रडता हसायला, आणि हसत हसत दुख भोगायला|

कधी काव्य असतं पावसाचं, प्रेमाच्या धारांनी मन चिंब भिजवणार,
कधी काव्य असतं पावसाचं, मनातलं दुख डोळ्यावाटे पूर म्हणून वाहणारं|

कविता ही अशीच असते, आयुष्यावर बोलणारी, 
शब्दांच्या माध्यामातून, मुक्यालाही बोलायला लावणारी|

Sunday, September 9, 2012

खट्याळ....

खट्याळ वारा...
अलगद अलगुज वाजवीत जातो, 
मनातील गुज तुला सांगून जातो....खट्याळ वारा....|

खट्याळ पाउस...
प्रेमाच्या धारा बरसत जातो,
भावनांनी चिंब भिजवून जातो....खट्याळ पाउस ...|

खट्याळ हसणं.....
मनास वेड लाऊन जातं,
जीवाची घालमेल वाढवून जातं....खट्याळ हसणं.....|

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...