Thursday, September 20, 2012

कविता

कविता ही प्रतिभा असते, कवी म्हणवणाऱ्या लोकांची,
शब्दांचा काव्य बनतं, ही देणगी आहे देवाची|

आयुष्याला अर्थ देते, देते दिशा जगण्याला,
लंगड्यालाही पाय देते, आयुष्याच्या शर्यतीत धावायला|

देते दृष्टी कवीला, सूर्याच्या पलीकडे पहायला,
शिकविते रडता रडता हसायला, आणि हसत हसत दुख भोगायला|

कधी काव्य असतं पावसाचं, प्रेमाच्या धारांनी मन चिंब भिजवणार,
कधी काव्य असतं पावसाचं, मनातलं दुख डोळ्यावाटे पूर म्हणून वाहणारं|

कविता ही अशीच असते, आयुष्यावर बोलणारी, 
शब्दांच्या माध्यामातून, मुक्यालाही बोलायला लावणारी|

No comments:

Post a Comment

नको कोणाला सांगू...

काय कुठे कधी कसे झाले सांग मला, कोण कोणाला कधी काय बोलले सांग मला, त्या बातमीला तिखट मीठ लावायचे मला, "नको कोणाला सांगू" म्हणत सर्...