तो क्षण निरोपाचा, असा येऊन ठाकला,
परी संवाद डोळ्याचा, अजून ना संपला...
सैल झाली आता मूठ, हात हातातून सुटला,
तो स्पर्श शेवटचा असा मनी साठवला,
तो स्पर्श शेवटचा असा मनी साठवला,
तू पाठमोरी झाली, मार्ग तुझा हा वेगळा,
परी संवाद मनाचा, अजून ना संपला...
कंठ दाटून हा आला, मूठ आवळली घट्ट,
हसत निरोप देण्याचा, व्यर्थ केला हट्ट,
तूझें बोलके डोळे आणि निरोप अबोला,
आपुल्या नात्याचा, प्रवास इथेच संपला...
-------विभव जोगळेकर
No comments:
Post a Comment